Monday, 19 October 2015

श्री.जयंत कुटुंबे (कवी)

एक दिवस,एक लेखक

श्री.जयंत कुटुंबे (कवी)

व्यवसाय : वरिष्ट निरीक्षक भांडार,मध्य रेल्वे.

३५ वर्षाच्या आतापर्यंतच्या अखंड रेल्वे सेवेत आत्तापर्यंत श्री.सुधाकर पोहेकर,हेमंत वट्टमवार, एस आर पगारे,बाळ कांदळकर अश्या विविध कला क्षेत्रातील मित्रांची दीर्घ मैत्री लाभली. त्यामुळे मला मध्य रेल्वेच्या कल्चर अकादमी मध्ये काही काळ काम करायची संधी मिळाली. या मित्रांसोबत मला 'चुल्लूभर पाणी' आणि इतर महत्वाच्या एकांकीकेमध्ये काम करता आले.
माझी खरी आवड ही काव्यलेखनाची आहे आणि गेली अनेक वर्ष विविध विषयांवर कविता केल्यात.बऱ्याचस्या माझ्या लिखित कवितांना काव्यसंमेलनात रसिकांची चांगली दाद मिळाली आणि सोबतच श्री.प्रवीण दवणे,श्री.राजा ढाले,श्री.रविंद्र पींगे या सारख्या मोठ्या सहित्यिकांकडून कौतुक आणि मार्गदर्शन मिळाले.
कराड येथील जेष्ठ कवी श्री.चंद्रकांत कुलकर्णी हे सुद्धा माझे जुने मित्र आणि मार्गदर्शक आहेत. या सर्वांच्या सहवासातून माझी कवितेची वाटचाल अखंड सुरु राहिली.
श्री.एस आर पगारे यांनी माझी 'कंफेशन' नावाची कविता अनेक कवी संमेलनातून 'मित्राची कविता'म्हणून सादर केली. तिथेही चांगला प्रतिसाद मिळाला.
लोकसत्ता वर्त्तमान पत्रात अनेक परिक्षण छापून आली. आणि अनेक दिवाळी अंकांमध्ये माझ्या कविता प्रसिद्ध झाल्या आहेत.
लवकरच माझा काव्यसंग्रह प्रसिद्ध होत असून त्यालाही रसिकांची दाद मिळेल अशी आशा करतो...
काही माझ्या आवडीच्या कविता...
जपणूक…
चांदण आता....
तितकस जाणवत नाही.
अनावश्यक ढगांचा परिणाम असेल
पण त्याचीही आता सवयच झालीय 
माझ्या इतकेच त्या आकशाला...
तसा आता....
आम्हाला एकमेकांकडे पाहायला वेळच् उरला नाहिये
कधी खिड़कीतून डोकावल की आकाश फार लांब गेल्यासारख वाटत 
अगदी माझ्या आवाक्या पलिकडे.
आणि मग.....
खिड़की बंद करावीच वाटते
आतल चांदण बंद करण्यासाठी...
-------------------------
ये पुन्हा....
पाहतो तुजला सखे मी थांबूनी वळनावरी
ओळखीचे शब्द येती अन पुन्हा ओठांवरी...।।धृ।।
आठवे आता कधीचा गोडवा त्या काळचा
विरह थोडासा जरी जिव व्याकुळ व्हायचा
रंगलो गण्यात आणि बोललो कवितेवरी...।।१।।
कैफ होता जीवनाला सुर होते सोबती
ना कधी केली तमा मी कोण होते भोवती
गूंजते कानात मैफल अजुन ही जादूभरी....।।२।।
ये पुन्हा तू विसरून सारी बंधने
जानुनी घे एकदा दोन्ही मनांची स्पंदने
बघ पुन्हा बदलेल जीवन बदलले सारे जरी....।।३।।

                                                                - जयंत कुटुंबे
==========================================================================

                                                                श्री.जयंत कुटुंबे हे माझ्या वडिलांच्या अत्यंत जवळच्या मित्रांपैकी एक...
माझ्या गैंगमेन या माहितीपटातील शीर्षक गीत 'फैलवाला' ही कविता माझ्या घरात खुप वर्षापासून होती...गैंगमेन करायच ठरल आणि ही कविता पुन्हा नव्याने हाती आली...त्यावेळी माझा आग्रह होता की हे गाण रिकॉर्डिंग झालेच तर महाराष्ट्राचे लाडके सुप्रसिद्ध शाहिर कै.विठ्ठल उमप दादा यांच्याच् आवाजात करायचे होते...परंतु ३० वर्षापुर्वी लिहिलेली ही कविता करणारे कवी श्री.चंद्रकांत कुलकर्णी हे बऱ्याच वर्षाआधी निवृत्त होवून परगावी राहायला गेले. रिकॉर्डिंग साठी गीतकाराची लेखी संमती आवश्यक होती...त्यावेळेस जयंत कुटुंबे यांनी त्यांना भेटून संमती दिली...
तसेच सध्या एस आर पगारे निर्मित 'येड़ा पाटिल' या चित्रपटासाठी त्यांनी उत्कृष्ट आणि संस्कृत शब्दात 'गंगाआरती' लिहली....
त्याला सुप्रसिद्ध गायक-संगीत संयोजन जितेंद्र तुपे आणि गायक प्रवीण डोणे ने त्याच्या पहाड़ी आवाजात आणि मी निर्माण केली आहे. लवकरच, त्यावर चित्रकरण होणार आहे.
अश्या या कवी मनाच्या माणसाला मानाचा मुजरा....

सुशील 




No comments:

Post a Comment