एक दिवस,एक लेखक
श्री.हेमंत वट्टमवार
(अभिनेता-दिग्दर्शक-निवेदक)
व्यवसाय : रेल्वेत कार्यालय अधीक्षक म्हणून कार्यरत...
लहानपणी मला खरतर तबला वादक व्हायची इच्छा होती.घरात आई-मामा संगीत विषारद...वडिलांना नाट्यकलेचि आवड...अश्या वातावरणात आणि कलाजोपासना असलेल्या कुटुंबात झाली. त्यातच आईच्या आग्रहस्तव गण्याच प्रशिक्षण घेतल पण त्यातही मन रमल नाही. शाळेच्या गेट टू गेधर पासून नाटुकल्यांमध्ये आणि 'वयम मोठम बुडबुडा' आणि इतर नाटकांसाठी कुमार कला केंद्राची बक्षीस भाग अनेक पुरस्कार आणि नामांकन मिळवली.त्याच दरम्यान काही व्यावसायिक नाटकांसाठी बोलवन आल...परंतु अभ्यासावर् परिणाम होईल म्हणून घरच्यांनी थांबवल.तेव्हा पासून खऱ्या अर्थाने नाटकाची आवड निर्माण झाली...नंतरच्या काळात काही वर्ष घरची परिस्थिति मुळे कॉलेज शिक्षण घेण् जमल नाही आणि पायात जवाबदारीच्या बेडया अडकल्या परंतु त्यातही नात्काच वेड मनात घेवून मी जगत होतो.
पुढे रेल्वे सेवेत आल्यावर सुधाकर पोहेकर,एस आर पगारे,सुहास विरकर,विजय धुमाळ,बाळा कांदळकर अश्या अमूल्य मित्र आणि त्यांची साथ लाभली. आणि रेल्वेत सांस्कृतिक आणि कलेच्या माध्यमातून अनेक नाटक,कार्यक्रम आम्ही सुरु करुन त्यात सहभागी झालो. माझ्या कलागुणांच् कौतुकही झाले आणि प्रशंसा सुद्धा...त्यानेच आणखी आत्मविश्वासने अनेक नाटकांच्,एकांकिकांच् सादरिकरण केले.
'कारागार','चुल्लूभर पाणी','छोटेबड़े','भिंत','भिखमंगे:,
'अन्नदाता','आय कंफ़ेन्स','नको नको म्हणताना ठो ठो हो','मदारी' 'पार्टनर','ठाणेदार आया','दार कोणी उघड़त नाही' या एकांकीकेच्या सादरिकरणातून अभिनयाचा ऋणानुबंध टिकून ठेवला... सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून १९८२ ते १९९२ या वर्षांत सलग पुरस्कार प्राप्त झाले.
सुधाकर पोहेकर आणि सुहास विरकर यांच्यासारख्या दिग्दर्शक मित्रांनी मला खुप मोलाचे मार्गदर्शन केले .राज्यनाट्य स्पर्धेत 'आंदोलन',
'षडज','k9zone', ई नाटकात उत्तम अभिनय करू शकलो.
त्याचसोबत अनुवादक म्हणून २७ एकांकिका आणि ७ फुल लेंथ नाटक यांचा हिंदीत अनुवाद केला.
प्रा.कमलाकर कानेटकर सरांच्या मार्गदर्शनाने कृष्णदीप नाटकात श्रीकांत मोघे,श्याम पोंक्षे या सारख्या मोठ्या कलाकारांसोबत काम करता आले.
दूरदर्शनवर ज्ञानदीप कार्यक्रमात राजिव जोशींची 'हृदयाची गोष्ट' ही एकांकिका आम्ही सादर केली. आणि खुप गाजली.
एस एम् जोशींनी व्यक्तिशः पत्र लिहून ती सर्व केंद्रावर ही एकांकिका दाखवून विशेष कौतुक केले.
पुढे निवेदक म्हणून काम करण्याचा योग आला.'रंग माझा वेगळा' या कलापथकासोबत निवेदक म्हणून २० शो केले. रैल्वेतील मेघमल्हार,संगीत संस्कृति,विविधा अश्या अनेक सांस्कृतिक कार्यक्रमाचे निवेदन लेखन तसेच निवेदन ही केले.
कवी म्हणून बऱ्याच कविता केल्या. ज्या मित्रांच्या आणि रासिकांच्या पसंतीत उतरल्या...
माझ्या आयुष्यातील सर्वात महत्वपूर्ण आणि अमूल्य क्षण मी नाट्यदर्पण या संस्थेत घालवले. अनेक मोठ्या नामवंत आणि दिग्गज कलाकारांच्या सानिध्यात राहून अभिनय आणि दिग्दर्शन आणि बरच काही शिकलो. विशेष म्हणजे पंधरा वर्ष 'कल्पना एक,आविष्कार अनेक' आणि 'नाट्यदर्पण रजनी' या कार्यक्रमात सहभागी होऊ शकलो.
असे अनेक कार्यक्रम केले,रिकॉर्डिंग्स केल्या,डबिंग केल्या. हे करताना पैसे मिळाले नाही पण झपाटुन काम केल्याचे समाधान मिळाले. म्हणूनच रजनीच्या २५ वर्षाच्या क्षणांना आम्ही ९० मीन. ची फ़िल्म आणि ६० मीन. च्या ६ ध्वनिफितींचा सेट आम्ही निर्माण करू शकलो. ज्यात एका 'संकीर्ण' कैसट चे निवेदन मी केले. 'रजनी अशी रंगलीच' हे शीर्षक गीत मी लिहल. रेल्वेत जनरल मैनेजर फंक्शन चे रीडिंग्स सातत्याने २२ वर्षे मी केले.
अजूनही मध्य रेल्वे कल्चर अकडेमीची नविन टीम ला काही मदत सहकार्य गरजेचे असल्यास मी अत्यानंदाने त्यात सहभागी होतो आणि सहकार्य करतो...
आयुष्याच्या रंगमंचावर असेच अनेकानेक पात्र,संहिता,कथा माझ्या आयुष्यात माझे अतिशय जवळचे मैत्री रुणानुबंधात मिळत गेले आणि मैत्री वाढत गेली.वरिष्ट मान्यवर,नटश्रेष्ट आणि आजवर हजारो सहकलाकारांनी माझ्या कलेच सोन केल.
शाळेच्या काळातील नाटुकलीच्या वेळेस पहिल्यांदा तोंडाला रंग लावला त्याची चमक अजुन उतरली नाही...ती चमक आज रेल्वे सेवेत ३५ वर्षे पूर्ण केल्यानंतरही कायम आहे.
एकखांबि तंबू असल्यामुळे घरातील जबाबदारी असल्यामुळे नोकरी करता करता कलेची सेवा करता आली.मुलांच्या करिअर ला महत्व आणि वेळ दिला...
आता रिटाएरमेंट नंतर पुन्हा जमेल तस काम करुन पुन्हा रंगभूमीशी जुळण्याचा विचार आहे.
- हेमंत वट्टमवार
==========================================================================
हेमंत काकांना मी लहानपनापासूनच पाहत आलो आहे. माझ्या वडिलांचे ते मध्य रेल्वे कल्चर अकादेमी मधील ते अत्यंत जवळचे मित्र...
त्याच सोबत अंतरविभागीय कार्यक्रमात मला देखील त्यांच्या मार्गदर्शनाखाली एक छोटीशी भूमिका करण्याची संधी मिळाली होती.आणि मध्य रेल्वे ऑडिटोरियम चा स्टेज मला पहिल्यांदा अनुभवायला आणि माझी कला सादर करायला मिळाला...
हेमंत काकांविषयी खुप काही बोलन्या सांगन्यासारख आहे.
माझ्या घरात आजही त्यांच्या कवितांची बुक आहेत.त्यातील ताजमहल ही कविता अप्रतिम आणि उल्लेखनीय आहे. त्याच सोबत या कवी मंडळींची खासियत म्हणजे त्यांनी त्यांच्या तरुणपनाच्या काळात 'ऑफिस मधील उखाणे' असा संग्रह लिहिला.
त्यात बॉस,पिओन,सहकर्मचारी,ऑफिस मधील एक आवडती ती... अश्या अनेक व्यक्तींवर उखाणे बनवले आहेत. मी नंतर ते नक्कीच शेयर करेल आपल्या सोबत ते उखाणे...
सुधाकर पोहेकर काका आणि हेमंत वट्टमवार काका समकालीन अभिनय संपन्न आणि नटश्रेष्ठ आहेत...पण या दोघांनाही मी जेव्हा माझ्या चष्मयातून पाहतो तेव्हा मला भारतीय चित्रपटातील सर्वात उत्कृष्ट अशी 'ओम पूरी व् नासिरिद्दीन शाह' ही बाप जोड़ी डोळ्यांसमोर उभी राहते.
खुप एनर्जी मिळते मला वारंवार अश्या काकालोकांकडून.... ज्यांनी आपल् समग्र जीवन इतर भौतिक जवाबदरयंसह कलेला वाहिल...कलेशी एकरूप राहिले.
अश्या या एका उत्कृष्ट नतश्रेष्ठ आणि बहुआयामी व्यक्तिमत्व श्री.हेमंत वट्टमवार सरांना मानाचा सलाम करतो...आणि भविष्यासाठी शुभेच्छा..
सचिन सुशील.
No comments:
Post a Comment