Tuesday, 27 October 2015

श्री.दिलीप मालवणकर (कवी-लेखक)


एक दिवस,एक लेखक
श्री.दिलीप मालवणकर
(कवी-लेखक)


माझे महाविद्यालयीन शिक्षण श्रीमती चांदीबाई महाविद्यालयात झाले. मराठी वाड्:मय मंडळाच्या वतीने विविध उपक्रम राबविले जात. मी आणि माझ्या सहकार्यांनी या मंडळाच्या वतीने 'पाथेय' नावाचे भिंतीपत्रक पाक्षिक स्वरुपात सुरु केले. त्यामुळे पत्रकार बनण्याच्या आधीच मी संपादक झालो. दरम्यान वयाच्या १९ व्या वर्षापासूनच माझे कवितालेखन,काव्यवाचन स्पर्धेत सहभाग,एकांकीकतून अभिनय आणि सामाजिक वाटचाल सुरु झाली होती.

याच दरम्यान एक प्रतिनिधिक काव्यसंग्रह प्रकाशित करावा अशी माझ्या डोक्यात कल्पना आली.पण आर्थिक पाठबळ नव्हते नाही प्रकाशनाचा अनुभव होता.परंतु आशावाद दुर्दम्य आणि कायम होता. मग एक उपाय सुचला आणि 'अवघ्या १० रूपयांत काव्यसंग्रह' असे वर्तमानपत्रात जाहिर आवेदन दिले. हे आवेदन प्रसिद्ध होताच महाराष्ट्राच्या विविध भागांतून कविता आल्या.मीच स्वयंघोषित संपादक असल्याने १० उत्कृष्ट कवींच्या प्रत्येकी ५ कविता निवडल्या आणि 'कवडसे' या नावाने प्रा.अशोक बागवे,कविवर्य नरेंद्र बोडके,प्रा.रतनलाल सोनग्रा यांच्या उपस्थितीत सन १९८० मध्ये हा काव्यसंग्रह प्रकाशित केला.अश्या प्रकारे माझा पहिले संपादित पुस्तक प्रसिद्ध झाले.

माझ्या पत्रकारितेच्या करकिर्दीच्या आधीही मी विविध नियतकलिकांतून प्रामुख्याने 'दै.नवशक्ति','दै.सन्मित्र','दै.जनादेश', आदी वर्तमानपत्रातून तसेच 'अजब लोकशक्ति' च्या संपादकीय सदरातून 
विपुल लेखन केले.माझे सामाजिक, राजकीय,प्रबोधनात्मक,टिकात्मक,वैचारिक,विश्लेषणात्मक लेख त्यावेळी वाचकांच्या पसंतीस उतरले. आणि १९७५ पासून माझ्या लेखन प्रवासास प्रारंभ झाला. सुरवातीस 'सा.मार्मिक',
'दै.गावकरी','सा.पाचोळा','सा.मेरिट' या नियतकलिकांमध्ये लेखन केले.'दै.नवशक्ती' चे तत्कालीन संपादक पु.रा.बेहरे यांच्या प्रोत्साहनमुळे मी समृद्ध लिखाण करू शकलो. अनेक ज्वलंत विषयांवरील लेखांचे २-२,३-३ लेख प्रसिद्ध होत. १९८७ च्या निवडणुकीचे प्रभागनिहाय विश्लेषण व् अंदाज तब्बल दहा दिवस प्रसिद्ध झाले.

दरम्यान मी १९८१ साली कोकण भवन येथे सार्वजनिक बांधकाम विभागातील 'संकल्प चित्र मंडळा'त स्टेनोग्राफर म्हणून सेवेत रुजू झालो.शासकीय नोकरी आणि निर्भीड पत्रकारीता एकत्र करणे शक्य नव्हते.त्यानुसार 'नोकरी' की 'पत्रकारीता' यापैकी एकाची निवड करने मला क्रमप्राप्त होते. त्यातील पत्रकारीतेला प्रथम प्राधान्य देवून,कायमस्वरूपी उत्तम वेतन असलेली नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. नोकरी सोडली;परंतू कुटुंबाची जवाबदारी होतीच.तेव्हा उपजीविकेसाठी मी 'हेमांगी प्रिंटर्स' हा छपाईचा व्यवसाय सुरु केला.त्याच सोबत छंद जोपासन्यासाठी 'सा.अजब लोकशक्ती' हे साप्ताहिक (२ ऑक्टो.१९८७) पासून सुरु केले.१९८७-२०१२ पर्यंत 'सा.अजब लोकशक्ती' सन्मानाने चालवले. पत्रकारीतेमुळे नावलौकिक व् प्रतिष्ठा मिळाली.

१९९२ च्या नगरपालिका निवडणुकीत १४ इच्छुक उमेदवारांतून मला शिवसेनेची उमेदवारी मिळाली.
या सर्व गदारोळात माझी पत्रकारीता अव्याहतपणे सुरु होती. सोबतच 'अस्मिता ट्रस्ट' च्या माध्यमातून साहित्यिक,शैक्षणिक,कला,क्रीड़ा,समाजसेवा क्षेत्रात कार्यही सुरु होते आणि आजही आहे. या वाटचालित
माझ्या हातून जे लिखाण झाले त्या निवडक लेखांचा समावेश मी 'आपल् उल्हासनगर' या उल्हासनगरशी संबंधित संग्रहात केला आहे.आजचे वर्तमानपत्र उद्याची रद्दी ठरते पण त्यातील वाचनिय संग्राह्य लेख पुस्तक रूपाने प्रकाशित केले तर ते अक्षर - वाड:मय ठरेल.भावी पिढीसाठी ते एक ठेवा ठरावा.म्हणून मी माझा 'मालवणी मसाला' हा संग्रह प्रकाशित केला. या संग्रहातील लेख मराठीचे विद्यार्थी आणि नवोदित पत्रकार यांना नक्कीच मार्गदर्शक ठरेल,अशी अपेक्षा आहे...

-श्री.दिलीप मालवणकर (पत्रकार-लेखक-कवी)
==========================================================================

                     माझ्या आधीच्या राहत्या घरी, अगदी माझ्या लहान पनापासून न चुकता दर आठवद्याला पोस्टाने वडिलांच्या (सुशील चांदोरीकर,वरिष्ट पत्रकार) नावाने दोन साप्ताहिक अंक येत असत. त्यातील एक दिल्ली येथील.....तर दूसरा श्री.दिलीप मालवणकर काका यांचा 'सा.अजब लोकशक्ती' ! त्या वेळेत एवढं कळत नसायच तेव्हा फ़क्त त्या सप्ताहिकातील फ़ोटोज़ आणि कविता वाचायला आवडायच्या...आणि पुढे हळूहळू त्याद्वारे उल्हासनगर मधील शैक्षणिक,सामाजिक आणि राजकारण यांच्याशी संबंधित बातम्या नित्य नियमाने वाचनात येवु लागल्या. पोस्टमेन लांबुन येताना दिसला की मग त्याला आधी पेपर ची विचारपुस् मी करीत असत.

बऱ्याच वर्षापासून माझ्या वडिलांचे आणि त्यांचे घनिष्ट मैत्रीपूर्ण संबंध...काही काळ दोघनीही 'दै.नवशक्ति' मध्ये सोबत होते आणि कल्याण-उल्हासनगर-अंबरनाथ पत्रकार संघात एकत्र पत्रकारीता कार्य करत होते. माझी शाळा 'उल्हास विद्यालय' मध्ये काकांच्या अस्मिता ट्रस्ट तर्फे विविध उपक्रम आणि कार्यक्रम आयोजित व्हायचे. त्यात दरवर्षी अभ्यास मालिका,कविता वाचन,काव्य स्पर्धा,वकृत्व स्पर्धा घेतल्या जात असे.

सुट्टीच्या दिवशी वडिलांसोबत 'हेमांगी प्रिंटिंग' प्रेस वर माझही आवडीने येणे-जाणे व्हायच. तिथले प्रिंटिंग मशीन,ब्लॉक्स,काळी शाई,छापूण झालेले पत्रक, कोरे पेपर्स पाहुन फार कुहुतुल वाटत असे. त्याच सोबत तिथे दिलीप सरांची भेट होत असे. त्या काळापासून काका त्यांच्या राजकीय जीवनातही अत्यंत प्रभावी आणि लोकप्रिय व्यक्तिमत्व आहेत.नगरवासियांच्या समस्या,प्रश्न,सुखसुविधा ई. बाबित ते त्या काळात एक उत्कृष्ट नगरसेवक म्हणून भूमिका बजावली आणि आजही ते कोणत्याही पदाशिवाय अखंड पने सर्वांना सहकार्य करत आहे. 

आजही श्री दिलीप मालवणकर काका समाजहिताच्या आणि जनसमान्यांसाठी शैक्षणिक,सामाजिक,साहित्यिक योगदनातून अखंड उल्हासनगर शहरात विविधपूर्ण उपक्रम सतत राबवत असतात. नुकत्याच षष्टिपूर्तिच्या निमित्ताने त्यांनी आधाराश्रम वसतीगृह,त्र्यम्बकेश्वर या आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलांना विविध स्वरुपात मदत केली आणि समाजातील या महत्वाच्या व्यक्ति घटकांविषयी आत्मीयता आणि जाणीव ठेवली. विशेष म्हणजे आजही ते त्यांच्या एवढ्या मोठ्या प्रपंचातून त्यांच्या 'कवितेला' आणि लिखानाला वेळ देतात आणि अतिशय सुंदर रचना काव्यातील अनेक प्रकारात (हायकू,चारोळी,शेरोशायरी,कविता) रूपाने लिहितात. 'उल्हासनगर' शहराबद्दल त्यांना कमालीची आत्मीयता आहे.

आज उल्हासनगर मध्ये मराठी साहित्यरुची जुन्या तसेच नविन पिढितिल विविध कलाकरांमध्ये आणि साहित्यप्रेमी जनतेमध्ये टिकवून रहावे यासाठी ते अविरत उपक्रम राबवतात आहे. त्यांचे आजही अखंड लिखाण सुरु आहे. आणि त्यांच्या निर्मित साहित्य लिखानाचा माझ्यासहित शहरातील सर्व जुन्या नविन पिढीला होत आला आहे आणि या पुढेही होइलच.

उल्हासनगर वर प्रेम करणाऱ्या आणि इथे राहणाऱ्या रहिवासियांनी आवर्जून घेवून वाचावित त्यांची 'आपल उल्हासनगर' आणि 'मालवणी मसाला' हे पुस्तक...आणि त्यांच्या आगामी कवितासंग्रहाची लवकरात लवकर आपल्या वाचनात येण्यासाठी आपण सारेच प्रतीक्षा करुयात...

त्यांच्या भावी साहित्यिक,सामाजिक,राजकीय वाटचाली साठी मनःपूर्वक शुभेच्छा...

- सचिन सुशील.




No comments:

Post a Comment