Monday, 19 October 2015

चंद्रशेखर कुलकर्णी (लेखक)

एक दिवस एक लेखक

चंद्रशेखर कुलकर्णी (लेखक)

राहणार : ठाणे

विद्यापीठाची कला शाखेची पदवी घेतल्यानंतर जीवनात काही तरी करुन दाखवन्याची जिद्द होती...पण अंधत्वामुळे आलेल्या मर्यादा स्वीकारुन मध्य रेल्वेत टेलीफोन ऑपरेटरची नोकरी स्वीकारली.
साहित्याची आवड लहानपनपासूनच होती.रुईया कॉलेज मध्ये शिकताना प्रा.वसंत बापट,प्रा.पुष्पा भावे आणि प्रा.सदानंद रेगे यांनीसाहित्याची गोडी अधिक वाघवली. त्या काळात अंधासाठी झालेल्या अनेक वकृत्व स्पर्धेमध्ये ऑन दी स्पॉट विषय सूचवायचे यात नेहमीच प्रथम-द्वितीय क्रमांक मिळायचा.
रेल्वेसेवेत होणाऱ्या हिंदी वकृत्व मध्ये प्रथम क्रमांक मिळायचा. त्यातच बाळ कांदळकर,एस आर पगारे,हेमंत वट्टमवार,जयंत कुटुंबे,सुरेश करमरकर आणि श्री.दिघे यांच्यासारख्या अनेक साहित्यिक मित्रांचा सहभाग लाभला.मध्य रेल साहित्यिक मंडळाच्या कार्यक्रमात आणि अंकुरवेल या नियमित कलिकाच्या निर्मितीत आणि प्रसिद्धित हिरारीने सहभाग घेतला...
जन्मापासून अंधत्वाशी संघर्ष करत असताना चिंतनाची आणि स्वसंवादाची एक चांगली सवय लागली. चर्चेतील माझे विचार लोकांना आवडू लागले त्यांच्या नित्य जीवनात उपयोगी पडू लागले.
श्री.बाळ कांदळकरानी असे विचार लिहून ठेवन्यास आग्रह केला आणि त्यातूनच माझ लिखाण सुरु झाले.
'नितांत' या दिवाळी अंकातून सतत ९ वर्ष लेख लिहित राहिलो.
'क्रिकेट व् जीवनाचे तत्वज्ञान','पॉझिटिव राहणे म्हणजे काय ?', 'धर्माचे बदलते रूप' या सारख्या गंभीर विषयावर लेख लिहिले.
आकाशवाणी मुंबई केंद्राच्या प्रसारीत होणाऱ्या अस्मिता वाहिनीच्या 'ऐशी अक्षरे रसिके' या सदराखाली बरच लिखाण केले...
'गनुमामा','धर्मेआजी' या सारखी व्यक्तिचित्रे लिखनातून साकारली आणि वाचकांच्या मनात जागृत ठेवली.'धन्यवाद' व् 'अनुकूल' सारखे चिंतनपर लेख तसेच 'हिमालयाची ओढ़','सेराभाव' प्रवास वर्णनात्मक तसेच अंधांसाठी सामाजिक विषयांवरही बरेच लिखाण केले.
अंधांसाठी खेळल्या जाणाऱ्या विशेष क्रिकेटमध्ये प्रथम मुंबई कप साठी संघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली.पंडित राजाराम शुक्ला आणि श्री.तेलवणे यांच्या मार्गदर्शनाखाली २०-२५ वर्षे तबला शिकलो आणि अनकवेळा त्यांच्या शास्त्रीय गायनाला साथ केली... अनेक निसर्गसहली,पावसाळी सहल,डोंगरकिल्ले यांच्या भटकंतीचा मनमुराद आनंद घेतला.
कोणत्याही वयातील व्यक्तिसोबत माणसाची मैत्री जुळते.निसर्ग हेच परमेश्वराचे रूप आहे.माणूस निसर्गाचाच एक भाग आहे.मानवता हाच खरा धर्म आहे असे साधे तत्त्वज्ञन आयुष्यभर जपले. लवकरच 'नितांत'प्रकाशन निर्मित माझे आत्मचरित्र लिहून पूर्ण होत आहे...आशा करतो त्यातील माझे विचार आपल्या पसंतीस पडतील...

- श्री.चंद्रशेखर शंकरराव कुलकर्णी
==========================================================================

तस पाहता श्री.कुलकर्णी काकांचा आणि माझ्या प्रत्यक्ष भेटीचा योग अजुन आला नाही.
काही अपवाद प्रसंग माणसाला जुळवते आणि साथ करुन देते त्यातील हे एक लेखक...
आज,हा लेख लिहताना मी खुश आहे की, आतापर्यंत रेल्वेत जुन्या ओळखीच्या लोकांपैकी हे दोन्हीही श्री.चंद्रकांत कुलकर्णी याचं माझे नाते जुळले..
मी खरच या बद्दल नेहमीच विचार करतो मी रेल्वेत बऱ्याच ज्येष्ट साहित्यिक/कलाकार आणि नवनिर्मिति जपणाऱ्या असंख्य लोकांची या माझ्या उपक्रमातील नव्याने ओळख झाली....
निर्माता अश्या लेखकांच्या लेखनीला कायम एक नविन आणि गूढ़ दृष्टी देवो....आभार !

सचिन सुशील



No comments:

Post a Comment