एक दिवस एक लेखक
विजय पुंडलिक जाधव (गायक-कव्वाल-गीतकार)
व्यवसाय : निवृत्त कर्मचारी,मध्य रेल्वे...
हल्ली मुक्काम : तळेगाव-दाभाडे,पुणे
लहानपणी गावातील पाटला सोबत काही कारणांवरुण वाद झाला पुढे हा वाद कोर्टापर्यंत गेला आणि माझे वडीलांची परिस्थिती हातावरची आणि दुर्बल असल्यामुळे पाटीलाने ही केस जिंकली पण पाटलाच्या अन्याय अत्याचाराला आळा घालयचा म्हणून पुढे वडिलांनी पुन्हा सिन्नर कोर्टात केस दाखल केली.
आणि या केसचे वकील पत्र डॉ.बाबासाहेबांनी घ्यावे म्हणून ते बाबासाहेबांना भेटले.केस सिन्नर कोर्टात न घेता मुम्बईला घ्या अस बाबासाहेबांनी माझ्या वडिलांना सांगितले पण आमची परिस्थिति नसल्यामुळे त्यांना सिन्नर कोर्टातच ही केस लढवण्याची विनंती केली.अखेरीस डॉ.बाबासाहेब हे सिन्नर ला कोर्टात आले आणि ही केस जिंकून सावकारीवृत्ति विरुद्ध आवाज उठवून त्याला आळा बसवला...
आणि याच कारणाने माझ्या मनात डॉ.बाबासाहेबांच् स्थान खुप मोठ आणि भक्कम झाल. आणि लहानपनापासूनच मी भीमगीते म्हणू लागलो खेड्यापाडयात भीम जयंती निम्मित गायनाचे कार्यक्रम सादर करू लागलो...
दरम्यान, त्या काळात दलित पँथर ची चळवळ सर्वत्र जोमाने उभी राहायला लागली. अन्याय अत्याचाराला वाचा फुटू लागली त्यात मी गाण्याच्या,कव्वालीच्या आणि प्रबोधन गितांच्या रूपाने सर्व समाजात,रास्तो-रस्ती, खेडोपाडी आणि गाव गाव गायनाने सादर करू लागलो. १९७० पासून मी ही चळवळीत सक्रीय झालो.
त्यातच, पोटापाण्याच्या व्यवस्थेसाठी नाशिक मध्ये आलो.तिथे सुमारे १५-२० वर्षे वात्सव्य केले.त्याच दरम्यान तिथले सुप्रसिद्ध गीतकार-लेखक भीमसेन चंद्रमोरे यांच्याशी भेट झाली आणि पुढे त्यांच्या कविता आणि कव्वाली माझ्या गाण्यात गावू लागलो.
परंतू रेल्वेसेवेत कार्यरत असल्यामुळे पुन्हा मनमाड ला यावे लागले आणि आणि त्यानंतर मनमाड ते खंडळा-लोणावळा अशी बदली झाली. कामाच्या ठिकाणी 'पॉइंट्समैन' या पदावर कार्यरत असल्यामुळे काम दिवसरात्र अखंड चालायचे त्याच दरम्यान खंडाळा बोगदयाच काम सुरु झाल. जंगलात सर्वत्र अंधारात साप,काटे,विंचु,वाघ इ.प्राण्यांची भीती असायची सतत...मग दिवसभर काम करुन आम्ही सर्व कामगार त्या जंगलाच्या ठिकाणी रात्री शेकोटी करुन एकत्र बसत असू. आणि विरंगूळा म्हणून सर्वांना गावून दखवायचो. हाच विरंगूळा माझ्या कमातील साहेब लोकांना आवडू लागला आणि पुढे त्यांच्याघरी गाण्याच्या कार्यक्रमाचे निमंत्रण येवू लागली. डॉ.बाबासाहेबांच्या जयंतीला आमच्या कार्यालयात आवर्जून माझ्या गायनाचे कार्यक्रम असायचे.
पुढे याच ठिकाणी मी सेवेतून सेवानिवृत्त झालो. आणि रिकामा वेळ वाया जावु नये म्हणून कामशेत येथे माझ्या काही जुन्या-नव्या मित्रांच्या सहाय्याने 'कला विकास महासंघ' ची स्थापना केली व् आता त्या संथेच्या कलेच्या माध्यमातून समाजाची सेवा करीत आहे.
१९७० पासून ते आज वर्ष २०१५ पर्यंत मी गायन करत आलो. आणि पुढेही गाईल.बऱ्याच मोठ्या मोठ्या ठिकाणी,जयंती कार्यक्रमात नावलौकिक मिळाला पण त्याची दखल घेतल्या गेली नाही आणि मी उपेक्षितच राहिलो. याची खंत आज वयाच्या ६७ व्या वर्षी खोल काळजात रुतून आहे.
==========================================================================
आयु.विजय जाधव हे माझे अत्यंत निकटवर्तीय नातेसंबंधातील महत्वाची व्यक्ती आहेत.
भीमगीते,प्रबोधन गीते,कव्वाली याच्याच सोबत आपल्या गोड आवाजातील त्यांचे प्रेमगीतही तेवढीच् सुंदर आणि सुरेल आहेत...त्यातील माझ्या आवडीच् त्यांनी लिहलेल एक गाण म्हणजे...
"तुम्हे और क्या दूँ में दिल के सिवाय तुमको हमारी नजर लग जाएँ..." या हिंदी गाण्याच्या चालीत त्यांनी रचलेल त्याचं...
'तुझी माझी जोड़ी बघाया जमल सार गाव,तू माझी मस्तानी मी तुझा बाजीराव....तू माझी मस्तानी मी तुझा बाजीराव...' हे गाण...
भीमगीते,प्रबोधन गीते,कव्वाली याच्याच सोबत आपल्या गोड आवाजातील त्यांचे प्रेमगीतही तेवढीच् सुंदर आणि सुरेल आहेत...त्यातील माझ्या आवडीच् त्यांनी लिहलेल एक गाण म्हणजे...
"तुम्हे और क्या दूँ में दिल के सिवाय तुमको हमारी नजर लग जाएँ..." या हिंदी गाण्याच्या चालीत त्यांनी रचलेल त्याचं...
'तुझी माझी जोड़ी बघाया जमल सार गाव,तू माझी मस्तानी मी तुझा बाजीराव....तू माझी मस्तानी मी तुझा बाजीराव...' हे गाण...
काही घटना माणसाच्या मनावर सखोल परिणाम करुन जातात आणि आजन्म त्या कलेच्या
रुपात मनात जपल्या जातात आणि यातूनच कलाकार जन्माला येतात आणि घड़तात...
आणि म्हणूनच विजय जाधव यांच्या सारख्या उपेक्षित कलाकारविषयी आज मला लिहीने गरजेचे वाटले.
अश्या महान गायकाला शतशः प्रणाम....सलाम !🙏🏻💐💐
सचिन सुशीलआणि म्हणूनच विजय जाधव यांच्या सारख्या उपेक्षित कलाकारविषयी आज मला लिहीने गरजेचे वाटले.
अश्या महान गायकाला शतशः प्रणाम....सलाम !🙏🏻💐💐
No comments:
Post a Comment