Tuesday, 20 October 2015

हिरा गुलाबराव बनसोडे (कवयत्री)

एक दिवस,एक लेखक


हिरा गुलाबराव बनसोडे (कवयत्री)

सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारिका,
मुंबई

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील गराडे या खेड़ेगावी माझा जन्म झाला. वडील म्युन्सिपार्टित मेंशन म्हणून काम करायचे. शिक्षणही म्युन्सिपार्टीच्या शाळेत झाले. माझ्या जन्माच्या वेळेस घरी साखर वाटली नाही की नावाच्या घुगरया वाटल्या की नाही हे मला माहीत नाही कारण मी मुलगी झाली हे वडलांना कळवल तेव्हा त्यांनी पत्रच फाडून टाकली.तिथुनच स्त्रीच्या बाईपनाची वेदना वाट्याला आली.
नववित असताना लग्न झाले आणि संसाराचा गाडा माझ्या कोवळया खांद्यांवर पडला.शिकायला परवानगी नव्हती पण काट्यांसोबत फुलही फुलतात त्याप्रमाणे पुढे माझ्या सासऱ्यांनी व् यजमानांनी मला शिक्षणास परवानगी दिली. प्राइवेट क्लास जॉइन करुन मी १९६२ ला 'एस एस सी' पास झाले.
१९६५ साली मला रेल्वेत नोकरी लागली. रेल्वेत असतानाच मी कविता करू लागले.लहानपना पासूनच गायची आवड होती. आणि मग कंठात गाणे आणि लेखनित कविता अशी माझी आणि कवितेची गळाभेट झाली.माझ्या श्वासात कविता कायम रुतून राहिली.कविता माझ्यात कधी विरघळली हे कळलच नाही.त्यानंतर माझ्या कविता मासिकांतून,
वर्तमानपत्रातून प्रसिद्ध होवू लागल्या. आकाशवाणी,दूरदर्शन आणि इतर काव्यसंमेलनात माझ्या कवितेचा सहभाग असायचा. माझ्या 'फिर्याद' या कविता संग्रहाचा मराठवाड़ा विद्यापीठातील बी ऐ च्या अभ्यासक्रमात सहभाग झाला.या वर्षापासून 'फिर्याद' कविता संग्रह एम् ऐ च्या अभ्यासक्रमात् आहे.
माझा पहिला काव्यसंग्रह 'पोर्णिमा' १९६९ साली प्रसिद्ध झाला. त्यात प्रेम,निसर्ग,वर्णन होती.पोर्णिमेची चांदण पानापानात झिरपायची.काव्यफुलांचा बहार असायचा.ती नजाकत अलगच असायची...मी त्यात रमून जायची.
पण समाजात दलित स्त्रियांवर होणारे अत्याचार,त्यांची विटम्बना,सवर्णानि केलेले बलात्कार,त्यांच्या त्या करुण किंकाळ्यांनी काळजाला आग लागली होती.आणि माझ्या कवितेने कुस बदलली.आता माझी कविता वयात आली होती.माझी कविता वयात आली होती.
त्यातूनच माझा 'फिर्याद' काव्यसंग्रह जन्मास आला त्यात मी स्त्रियांच्या व्यथा,वेदना,तरफड आणि जखमा समाजापुढे मांडल्या.त्यातल्या कविता स्त्रियांना आपल्या वाटल्या.'फिर्याद' हा काव्यसंग्रह खुप गाजला.त्यातील कवितांचे हिंदी,इंग्रजी,उर्दू,कन्नड़,गुजराती भाषेत भाषांतर झाली.
आत्तापर्यंत माझे 'पोर्णिमा','फिर्याद' आणि 'फिनिक्स' असे तीन काव्यसंग्रह प्रकाशित झाले आणि वाचकांच्या पसंतीस मनमुराद उतरले आहेत. लवकरच 'फ़क्त तुझ्यासाठी' हा काव्यसंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर आहे.

- 'फीनिक्स' ला महाराष्ट्र राज्याचा 'कुसुमाग्रज' पुरस्कार (२००१-२००२)
- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मिशन,कैनेडा पुरस्कार (२००२)
- अस्मितादर्शन चा 'अहिल्याबाई होळकर' पुरस्कार
- दया पवार पुरस्कार (२००८-२००९)
- कर्मवीर दादासाहेब पुरस्कार (२००२)
- संबोधि प्रतिष्ठान पुरस्कार (२००८)
आणि इतर अनेक महत्वाचे पुरस्कार.

माझ्या रेल्वेच्या सेवेत मी अनेक सांस्कृतिक कार्यक्रम आणि कविसंमेलनात भाग घेत असे.विशेष महत्वाचे म्हणजे त्या काळात आयु.सुशील पगारे (चांदोरीकर) हे 'रेलप्रभा' साहित्य मंडळामार्फ़त 'रेलप्रभा' हे मासिक काढयचे त्यात ओढिने आणि आत्मियतेने माझ्या कवितेचा सहभाग असायचा...अजूनही हे एकमेव साहित्यिक मासिक सुरु आहे रेल्वेत.त्यांनी या मासिकासाठी फार कष्ट घेतले. त्याबद्दल त्यांचा अभिमान वाटतो.
परंतू,रेल्वेने आमच्या सारख्या सहित्यिकांना कधीच खेळाडूंसारखी वागणूक आणि प्रोत्साहन दिले नाही याची खंत वाटते कायमच !
माझ्या साहित्यिक प्रवासात माझ्या पतींनी मला नेहमीच सहाय्य केले माझ्या कवितेचे सर्व श्रेय त्यांचेच आहे.
जीवाच्या कळा जीवालाच कळतात आणि तेच माझ्या जीवलगांनी माझ्यासाठी केले.
- हिराताई गुलाबराव बनसोडे.
==========================================================================
ज्येष्ट कवयत्री हिराताई बनसोडे या माझ्या कौटुंबिक रुणानुबंधातील अत्यंत जवळच्या नात्यातून आत्त्या लागतात.
आज मला त्यांच्यावर लेख लिहायाला मिळाला हे माझ सौभाग्य आहे.रेल्वेतील सांस्कृतिक कार्यक्रमात लहानपनापासूनच माझ जाण येणे आणि सहभाग असायचा. त्यातच लहान वयात घरात 'रेलप्रभा' मसिकांचे दर महिन्यांचे अंक घरात असायचे. आणि प्रत्येक अंकात हीराताईंची कविता असायची. त्या काळात कविता समजत नसायच्या पण त्यातील शब्द आकर्षित करायचे आणि मग त्या संग्रही रहायच्या...
जेव्हा कळायला लागले.वाचनाची आणि लिखानाची गोडी लागली आणि कविता अंतरंगात सजायला लागली तेव्हा याच संग्रहातील कवितांनी साहित्याशी ओळख निर्माण करुन दिली. 'फेमिनिन पोएट्री' चा अर्थ त्या वयात हिरा आत्यांच्या कविता वाचून कळाला होता.
आजही त्यांच्या जुन्या कवितांचे संग्रह घरात कायम आहेत.त्यांचे स्थान माझ्या निवडक पुस्तकात आवडतीचे आहे. आजच्या समृद्ध जीवन संपन्न स्त्रियांच्या कविता आणि त्या काळातील हिरा आत्यांसारख्या शोषित आणि पीड़ित परिस्थितीत घडलेल्या प्रतिभाशाली कवयत्रिंमध्ये बरीच तफावत आढळते. हा पण स्वरुप 'फेमिनिन' असते हे मानन्यात काही गैर नाही.
हिराआत्या आणि त्या काळच्या कवींनी सहित्यिकांनी तो काळ गाजवला आणि आपले साहित्य न केवळ निर्माण केले-रचले तर त्याला प्रभावीपने जनमाणसात मांडले आणि अजूनही जिवंत ठेवले आहे.
कविवर्य ग्रेस यांच्या 'Physical form of Poetry' या वाक्याप्रमाने या कवियत्रीने आजही कविता आपल्या आत अजूनही जिवंत ठेवली आहे.
माझ्यामते, 'Feminine poetry is a constructive build up of saturated woman words in her solicited world' या प्रत्ययातूनच एका खऱ्या कवयत्रीचे निर्मितिक्षेत्र उदयास येते आणि त्यातूनच तीला निर्मितीचा साक्षात्कार होत असतो. आणि त्यातूनच तिच्यातली कविता जन्म किंवा मरण पावते...
खऱ्या अर्थाने मला स्त्रीवादी कविता आजही फक्त आणि फ़क्त हिरा बनसोडे आत्यांच्या कवितेत समजते.
माझ्या वडिलांच्या सोबत मलाही हिरताईंच्या सानिध्यात बालपण ते आजतगायत त्यांच्या सानिध्यात राहता आले याचा अभिमान आणि आनंद वाटतो मला. बऱ्याच वेळा आम्ही आजही भेटून अनेक विषयांवर साहित्यावर चर्चा करतो. आज पर्यंत हिरा आत्यांनी मला माझ्या 'ग्रेस फेस्टिवल २०१४,मुंबई' या सारख्या कविवर्य 'ग्रेस' यांच्या साहित्यावर आधारित संकल्पना निर्मितीमध्ये आणि माझ्या प्रत्येक नवनिर्मितीच्या प्रक्रियेत अतिशय महत्वाच् आणि मोलाच मार्गदर्शन केल आहे.
बरच काही लिहिन्यासारख आणि सांगन्यासारख आहे हिरा बनसोडे आत्यंविषयी...पण लवकरच भविष्यातील माझ्या काही निर्मिती प्रकल्पात त्यांच्या विषयी इतर माध्यमांतून आपल्या समोर मांडेलच...
सचिन सुशील.


5 comments:

  1. Chhan aahe tumacha blog. Changali mahiti milali.

    ReplyDelete
  2. Very informative article.If you can write more about Mrs Hira Bansode, will be yet helpful.

    ReplyDelete
  3. सर हिरा बनसोडे यांचा पौर्णिमा हा कविता संग्रह कधी प्रकाशित झाला ह्याची निश्चिती पटवून द्याल का. कारण एका ठिकाणी मी तो संग्रह १९७० साली प्रकाशित झाला असं वाचलं आहे. आणि आता तुमच्या लेखात तो १९६९ साली प्रकाशित झाला असं आहे. तर महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या खंडात साहित्याच्या इतिहासात त्या कवितासंग्रह बद्दल प्रकाशन वर्ष दिलेला नाही. कृपया यावर थोडं मार्गदर्शन कारा. 7400447217

    ReplyDelete